पाकिस्तान कोणत्याही क्षणी भारतावर करेल हल्ला: तारिक करीम

ढाका: पाकिस्तानी संरक्षण दलांनी केवळ भारताला शह देण्यासाठी अण्वस्त्रसज्जता केली असून कोणत्याही क्षणी पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो; असा इशारा बांगलादेशाचे भारतातील उच्चायुक्त तारिक करीम यांनी दिला आहे.

पाकिस्तानी सैन्य मनात आणल्यास केवळ आठ सेकंदात भारतावर हल्ला करू शकते; असा दावाही त्यांनी केला. यापूर्वी एका ब्रिटीश मुत्सद्द्यानेही असा दावा केला आहे.

भारताने लोकशाहीच्या मार्गाने आपला विकास केला. पाकिस्तानने मात्र भारताशी विकासाबाबत स्पर्धा करण्याऐवजी शस्त्रस्पर्धेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पाकिस्तानची प्रगती होऊ शकली नाही. तो मागासच राहिला; अशी टीकाही करीम यांनी केली.

Leave a Comment