देवकरांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीचे घुमजाव

मुंबई,१० ऑगस्ट-घरकुल घोटाळ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीने कोलांटउडी घेतली आहे. देवकरांना अभय देण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला आहे.

गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादीकडं राजीनामा दिला आहे, मात्र अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.

घरकुल घोटाळाप्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.त्यामुळे याप्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते मदन बाफना यांनी सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा घुमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणात देवकरांना अभय दिला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.एतके गंभीर आरोप असून तसेच उच्चन्यायालयाने जमीन फेटाळला असून देखील देवकरांना अभय का दिले जात आहे याची चर्चा सर्वत्र आहे. राष्ट्रवादीची ही भूमिका नैतिकतेला काळिमा फासणारी आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

Leave a Comment