ट्विंकल व रिंकीलाच आशीर्वाद

सुपर स्टार असलेल्या राजेश खन्ना यांनी कोट्यवधी रुपायची संपती ठेवली आहे. ही संपती कुणाला मिळणार यावरून सध्या तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सर्व संपतीचा वारस म्हणून त्यांनी पत्नी डिम्पल हिची निवड न करता ट्विंकल व रिंकीच्या नावाने ही कोट्यवधी रुपयांची संपती केली आहे. त्यांचा जुहू येथील प्रसिद्ध असलेला आशीर्वाद हा बंगला सुद्धा या दोन्ही मुलीच्या नावे केला असल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्षापासून राजेश खन्ना व डिम्पल हे दोघेही त्यांच्यात मतभेद झाल्यापासून विभक्त राहत होते. त्यामुळे ही संपती ती कुणाच्या नावे करणार याबाबत उत्सुकता लागली होती.
वर्षभरापूर्वीच राजेश खन्ना यांना मृत्यचा आभास निर्माण झाला होता. त्यावेळीच त्यांना आपण जास्त दिवस टिकणार नसल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी लगेचच मृत्यू पत्र तयार करून घेतले होते. ज्यामध्ये सर्व संपती व बँकेमधील खाते हाताळण्याची परवानगी त्यांनी ट्विंकल व रिंकीला दिली आहे. त्याशिवाय आशीर्वाद बंगला व उर्वरित सर्व संपती त्यानी या दोघीच्या नावे केली आहे. यामधून त्यानी पत्नी डिंपलचे नाव मात्र पूर्णपणे वगळले आहे. त्यामुळे ही सर्व संपती येत्या काही दिवसातच ट्विंकल व रिंकीच्या नावे होणार असल्याचे समजते.

Leave a Comment