नवी दिल्ली, दि. २३ – काही महिन्यांत देशाच्या दुर्गम ग्रामीण भागात वीज नसलेल्या गावांमध्येही तुम्हाला चक्क एटीएमची सुविधा दिसेल. आश्चर्याचा धक्का बसला ना! मुळात हे एटीएम सौरऊर्जेवर चालणारे असतील. या एटीएमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ऑटोमेटेड वायस आणि पावती स्थानिक भाषेत मिळणार आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉरपोरेशन (आयएफसी) मुळे हे शक्य झाले आहे. आयएफसी जागतिक बँकेचा सदस्य आहे.
गेल्या महिन्यात आयएफसीने घोषणा केली होती की, ते चेन्नईच्या वोरटेक्स इंजिनियरिंगमध्ये २७ लाख डॉलर (१४.९ कोटी रुपये)ची गुंतवणूक करणार आहे. कमी किंमतीत सौर ऊर्जा एटीएम बनवीत आहे. गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाने कमी खर्चात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एटीएम चलविण्यासाठी वेंडर्सची निवड केली आहे. आयएफसी आणि मंत्रालयाच्या या प्रयत्नामुळे वोरटेक्सला देशाच्या दुर्गम भागात २००० सौर ऊर्जा संचालित एटीएम लावण्यास मदत मिळणार आहे.
अशी झाली सुरूवात – चार वर्षाच्या संशोधनानंतर वोरटेक्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) विजय बाबू यांनी आयआयटी मद्रासच्या सहयोगाने २००८ मध्ये कंपनीची सुरूवात केली होती. सध्या ते देशभराच्या अंतर्गत भागात सहाशे एटीएम स्थापन केले आहेत.
४८ वर्षीय विजय यांनी सांगितले की, सौर ऊर्जेवर चालणारे एटीएम बाहेरून नेहमीच्या एटीएमसारखेच दिसते. अर्थात, त्याच्या कामाची पद्धत नेहमीच्या एटीएमपेक्षा एकदम वेगळी आहे. यात आठ तासाचा बॅकअप पावर असते. यात शंभर वॅटपेक्षा कमी वीज लागते. नियमित एटीएममध्ये ६०० वॅट वीज लागते. बँकांसाठी दररोज एक एटीएम २०० लोकांद्वारे आर्थिक देवाण घेवाणीचा व्यावहारिक असते. मात्र गावातील सौर ऊर्जेवर चालणार्या या एटीएममधून दररोज ७५ लोकच पैसे काढू शकतात.
-२००८ मध्य देशात ३५ हजार एटीएम होते. आता ती संख्या ८० हजार झाली आहे.
– येत्या दोन वर्षात भारतात एटीएमची संख्या १.७५ लाख होईल.
– वोरटेक्सची योजना येत्या काही वर्षात सुमारे ६५ हजार एटीएम बनविण्याची आहे. यापैकी ३० टक्के सौर उर्जेवर चालणारे असतील.