करीनामुळे तुटली दोस्ती

आतापर्यंत सर्व युद्ध आणि लढाया केवळ महिलेमुळे झाल्याचे म्हटले जाते. महाभारत हे द्रौपदीमुळे घडले तर रामायण हे सीतेमुळे घडले. चांगल्या दोस्तीमध्ये केवळ महिलेमुळे फूट पडते हे आजपर्यंत अनेक चित्रपटातून दाखविण्यात आले. मात्र ही कथा चित्रपट निर्मिती करणाऱ्या दोन दोस्तांच्या  बाबतीत घडली आहे. त्यामुळे आता त्या दोघांनी अबोला धरला आहे.  

चांगले मित्र असलेले संजय लीला भन्साली व करण जोहर यांच्यातील संबध गेल्या काही दिवसापासून खूपच बिघडले आहेत. अभिनेत्री करीना कपूरमुळे त्यांची मैत्री तुटली आहे. शिरीन फरहाद निर्मित चित्रपटाच्या प्रकाशनाला संजय लीला भन्साली  उपस्थित न राहिल्याने आता ही चर्चा बॉलीवूड मध्ये जोरात रंगू लागली आहे. या कार्यक्रमाला करण जोहर उपस्थित राहणार असल्याने भन्साली आला नसल्याची चर्चा आहे.

करीनाने भन्साळी दिग्दर्शीत राम लीला चित्रपट सोडून करणच्या चित्रपटात काम करण्याचे ठरविल्याने या दोघातील संबध ताणले गेले आहेत. एवढेच नव्हे तर संजयच्या बहिणीने आयोजित करण्यात आलेल्या एका पोस्टर प्रकाशनाच्या कार्यक्रमाला करण उपस्थित असल्याने संजय गेला नाही.

Leave a Comment