
नवी दिल्ली, दि. १६ – केंद्र शासनानाकडून परवानगी मिळेल या अपेक्षेने भारतीय क्रिकेट बोर्डाने तब्बल पाच वर्षांनंतर भारत पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे नियोजन केले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार डिसेंबर महिन्यात पाक संघ भारताचा दौरा करणार असून, या दौर्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामने होणार आहेत.
