
नवी दिल्ली दि.१६ – जम्मू-काश्मिरात अमरनाथ यात्रेस जाणार्या ६७ यात्रेकरूंचा यात्रेच्या काळात झालेल्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारबरोबरच केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण तसेच वन मंत्रालय, राज्य सरकार व अमरनाथ देवस्थान मंडळास नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिशीला सात दिवसांत उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
