
पुणे, दि. ६ – पावसाळा लांबल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात पाणी काही दिवस पुरेल इतकेच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा नेहमीप्रमाणेच होईल. त्यानंतर मात्र पाणी वाटपाचे नियोजन कसे करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
