
नुकत्याच पार पडलेल्या गुरूपौर्णिमेनिमित्ताने भाविकांनी देशभरातील प्रसिद्ध मंदिरात रांगा लावून आणि देवाला कांही ना कांही अर्पण करून देवांचे आशीर्वाद घेतले असले तरी यंदा या मंदिरातून सोने अर्पण करण्याचे प्रमाण चांगलेच घटले असल्याचे दिसून आले आहे. अगदी तिरूपती,गुरूवायूर ही प्रसिद्ध मंदिरेही त्याला अपवाद नाहीत. सोन्याचे चढलेले दर यामुळे भाविकांनी यंदा सोन्यापेक्षा रोख रककमच देवापुढे ठेवणे पसंत केल्याचे मंदिर व्यवस्थापन समित्यांकडून सांगण्यात आले.
