लग्नाबाबतची मानसिकता बदला – आमीर खान

सर्वच ठिकाणी  बदल स्वीकारत असताना पूर्वीच्या तुलनेत लग्नाच्या मानसिकतेत ही  दिवसेदिवस बदल होत असून आता हे बदल काळाप्रमाणे समाजाला स्वीकारावे लागणार असल्याचे मत आघाडीचा नायक अमीर खान यानी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले. त्यामुळे सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

लग्नाच्या बाबतीत आता युवक  स्वत: होऊन साथीदाराची निवड करीत आहेत. ही एक स्वागतार्ह बाब आहे. याचे सर्व समाजाने कौतुकच केले पाहिजे. अन्यथा पारंपारिकरित्या विवाह केल्याने गेल्या काही दिवसात त्याचा विपरीत परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाल्याचा पहावयास मिळत आहे. आजची युवा पिढी हुशार झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आता ते योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अशाप्रकारचा बदल स्वीकारण्याची मानसिकता सर्व समाजाने स्वीकारायला हवी असे ही आमीरने स्पष्ट केले.

लग्न करीत असताना पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला  हवे त्यामुळे त्यांच्या मनातील भीती दूर होऊन ते योग्य निर्णय घेऊ शकतील. नेहमी त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा. त्याशिवाय लग्नानंतर त्यांना कशाप्रकारे आनंदी जीवन जगता येईल यासाठी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शक म्हणून सल्ला देण्याची गरज असल्याचेही आमिरने सांगितले

Leave a Comment