
मुंबई दि.३- मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतून महसूल, वन तसेच नागरी विकास खात्याच्या सुमारे ११० फायली परत मिळविण्याचे प्रयत्न पुरातत्त्व विभागाच्या सहाय्याने यशस्वी होताना दिसत आहेत. चौथ्या, पाचव्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयातील फायली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावरही त्यातून सुमारे ९ हजार कागदपत्र वरळी डेअरीच्या जागेत गेले आठवडाभर सुकविण्याचे काम सुरू आहे. त्यातून ११० फायली परत मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
