संप सुरू असताना एअर इंडिया प्रवाशांची संख्या वाढली

नवी दिल्ली, दि. २ –  एअर इंडियात ५५ दिवसापासून संप सुरू असताना एक जूनपासून २० जूनदरम्यान गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत तीन टक्के वाढ झाली. एअर इंडिया या आठवडी हॉंगकॉंगसाठी आपली सेवा देखील सुरू करणार आहे.
मासिक आढाव्यात आढळले की, जूनच्या पहिल्या २० दिवसात एअर इंडियामार्फत ७,१६,००० लोकांना प्रवास केला जे २०११ वर्षाच्या या कालावधीपेक्षा तीन टक्के जास्त आहे.

एअर इंडियाच्या एक वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, प्रवासी भाड्याने मिळणार्‍या महसुलमध्येही पाच टक्के वाढ झाली आहे. एक जूनपासून २२ जून, २०११ दरम्यान ही ५८२ कोटी रुपये होती तसेच यावेळी ही ६०९ कोटी रुपये झाली. आम्ही प्रवासी भाड्यामार्फत महसुलमध्ये ही वाढ संप सुरू असल्यामुळे आपली १८.५ टक्के कमी करूनही प्राप्त केली आहे. संपाने फक्त आमची अंतरराष्ट्रीय उड्डाण प्रभावित झाली नव्हे तर घरगुती क्षमतादेखील प्रभावित झाली.

कंपनीने प्रवाशांची जास्त संख्या कायम ठेवण्यासाठी प्रमोशन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. एअर इंडिया पूर्व अशियाची आपली काही उड्डाण सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे, जे संपामुळे प्रभावित झाले आहे.