अक्षयचे नशीब पुन्हा एकदा जोरावर

चित्रपटसृष्टीत सलग एक डझन पेक्षाही अधिक फ्लॉप चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याची इमेज काहीशी खराब झाली होती. पण गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेले हाउसफुल २ व रावडी राठोड या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अक्षयकुमारचे नशीब चांगलेच उजळले आहे.

बॉलीवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी एकाचे नशीब उजळते तर एकाचे नशीब मार खात असते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत शुक्रवारच्या फीवरला फारच महत्त्व आहे.  शुक्रवार  आला की, चित्रपट रीलीज होणाऱ्या चित्रपटाची टीम काय होणार या कल्पनेने खुपच तणावाखाली असते. अक्षयकुमार सुद्धा मार्च २०११ पासून त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने बराच तणावाखाली  होता.

या काळात आलेले अक्षयकुमारचे टशन, चांदणी चौक टू चायना, कम्बख्त इश्क, दे दनादन, तीस मार खा, देसी बॉय असे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते. काही दिवसापुर्विंच प्रदर्शित झालेल्या हाउसफुल २ या चित्रपटाने त्याची थोडीसी इज्जत रहिली होती. मात्र यामधून मार्ग काढत त्याने प्रभू देवाच्या अक्शन चित्रपटाकडे तो वळाला आणि तीच लॉटरी त्याला लागली. रावडी राठोडने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असून कोट्यवधी रुपयाची कमाई करणाऱ्या चित्रपटात त्याचा समावेश झाला आहे. या यशामुळे अक्षयकुमार आता आमीर खान व सलमान खान यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. आगामी काळात ही  त्याच्याकडे आणखीन काही दाक्षिणात्य निर्मात्याचे चित्रपट असल्याने त्याची कामगिरी कशी राहणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment