
मुंबई दि.२८- महागाई, इंधनवाढ, आर्थिक मंदी, घसरलेले उत्पादन, घसरलेली निर्यात, रूपयाचे अवमूल्यन या देशाला भेडसावणार्या अनेक समस्यांची तमा न बाळगता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागांच्या किंमती वाढतच असल्याचे दिसून येत आहे. या मागची कारणमीमांसा अनेक तज्ञ आपापल्या पद्धतीने करू पाहात आहेत.
