
मुंबई, दि.२५ – मंत्रालयाला लागलेल्या आगीची केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्यात येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले. अग्नीतांडवानंतर चार दिवसांनी आज मंत्रालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. याबाबात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
