
पुणे,दि. २५ – कोरडी पडलेली नीरा… पाण्याची डबकी… त्यातच स्नान करणारे वारकरी… ही परिस्थिती आहे पुणे आणि सोलापूरच्या हद्दीवर असलेल्या नीरेच्या पात्रातली. महाराष्ट्रातल्या या दुष्काळाचे चटके साक्षात तुकोबांनाही बसले आहेत. नीरा नदीचे पात्र कोरडं पडल्यामुळे तुकाराम महाराजांच्या पादुकांना चक्क टँकरच्या पाण्याने स्नान घालण्याची पाळी आली.
