मुंबई दि.२२ – मंत्रालयाला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये महत्त्वाच्या खात्यांची दालने असलेले तीन मजले जळून खाक झाल्याने आता राज्याचा कारभार विधानभवन, प्रशासकीय इमारत तसेच सह्याद्री अतिथिगृहातून चालविण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
राज्यावर आलेल्या या आपत्तीमुळे पुढच्याच महिन्यात सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही कळते. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढील सहा महिने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम स्वीकारणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.