माझेच कार्यालय भस्मसात कसे झाले? – अजित पवार

मुंबई, दि. २२ – मंत्रालयाला गुरुवारी लागलेल्या आगीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी हे अग्निकांड म्हणजे एक कट असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे दादा-बाबा आमनेसामने उभे ठाकले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगीवरुन संशय व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित कसे राहिले, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

अजित पवार यांनी सकाळी मंत्रालयाची पाहणी केली आणि किती नुकसान झाले याची माहिती दिली व आगीच्या घटनेवर आश्‍चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ’मुख्यमंत्री साहेबांच्या दालनातील सोफा, खुर्ची, टेबल तसेच पडलेले आहेत, जसे माझ्या दालनात पडले आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरील लेटरपॅडही जैसे थे आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील दोन दालन आगीत पूर्णपणे खाक झाले आहेत. समोरील दोन हॉल पूर्णपणे जाळले आहेत, माझाच पूर्ण मजला आगीत खाक झाला. मुख्यमंत्री साहेबांचे दालन सोडून सर्वकाही जाळले आहे.’’

अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे नवाच वाद निर्माण झाला. त्यावरुन दादा आणि बाबांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

Leave a Comment