
मुंबई दि.१५ – दिवसेनदिवस राज्यातील तरूण पिढी पानमसाला आणि गुटख्याच्या विळख्यात जात असल्याने या पिढीची या व्यसनांतून सुटका करण्यासाठी राज्यात गुटखाबंदीबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी रवाना करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापूर्वी २००२ सालीही राज्यात पानमसाला आणि गुटखाबंदी करण्यात आली होती मात्र गुटखा उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निर्णय राज्यसरकार विरोधात लागला होता.
