
पंढरपूर, दि. १५ – सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून या धरणाच्या मृतसाठ्यातील १६ टी. एम. सी. पाण्याचा वापर झाला आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर धरणाच्या पाण्याची पातळी आणखी खालावणार असल्याने येणार्या आषाढी वारीवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
