
देशामध्ये तांत्रिक शिक्षणाला एकदमच गती आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), तंत्रनिकेतन (पॉलीटेक्निक) आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या बरोबरच संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यांचे शिक्षण देणार्या अनेक संस्था नित्य उदयाला येत आहेत. या संस्था एवढ्या गतीने सुरू होत आहेत की, त्यांच्या गतीने त्या त्या संस्थांतले शिक्षक आणि प्राध्यापक मात्र तयार होत नाहीत. त्यामुळे यासर्व शिक्षण संस्थांत शिक्षकांची फार वानवा आहे. तंत्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांची उद्योगामध्ये किंवा इतरत्र कोठे तरी नोकरी मिळावी अशी इच्छा असते. परंतु हेतुपुरस्सरपणे अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळणारे तंत्रज्ञ फारच कमी आहेत. तेव्हा या रोजगार संधीचा विचार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच केला पाहिजे.
