
केंद्र सरकारने साखर उद्योगाला नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास हा निर्णय तत्त्वत: घेतला आहे आणि त्याचे तपशील ठरवून त्याला कितपत मुक्त करायचे आणि अद्यापही त्याच्यावर किती बंधने कायम ठेवायची यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारची एक समिती मुंबईला आली आहे. या विनियंत्रणाला काही लोकांचा विरोध आहे. आपल्या देशात अर्थतज्ज्ञांचा एक गट नेहमीच असा विरोध करीत असतो. शेतकर्यांच्या हिताचा काही निर्णय घेण्याची वेळ आली की ही मंडळी नाना तर्हेचे युक्तिवाद करून आणि प्रचाराची राळ उडवून सरकारच्या या निर्णयाला खो घालत असतात. आता मात्र केंद्र सरकारचा याबाबत जवळ जवळ नक्कीच निर्णय झालेला आहे पण तरीही हे विनियंत्रण अनावश्यक आहे, घातक आहे असे युक्तिवाद सुरूच असतात. अशा विरोधात कसलेही तर्कशास्त्र वापरलेले नसते. जगात साखर उत्पादन भरपूर होते तिथे हा उद्योग मुक्त आहे मग भारतात का नको, याचे सयुक्तिक उत्तर तर हे लोक कधीच देत नाहीत.
मला वाट्त कोणते हि क्षेत्र खुले करने जेवडे फायदयाचे त्या पेक्षा तोट्याचे आहे. बाजरातिल आजचि तेजि उद्या मन्दित बद्लु श्कते तेव्हा शेतकर्याचे नुकसान जास्त होईल त्या्चे काय?