
मुंबई, दि. ११ – बचतगटांच्या माध्यमातून लाखो कुटुंबे आर्थिकदृष्टया स्वावलंबी होत आहेत. आर्थिक चळवळ वेग घेत असताना बचतगटांना अर्थसहाय्य करण्यास काही राष्ट्रीयकृत बँका तयार होत नाहीत. या बँकाची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाला कळवली जाईल. त्याचबरोबर राज्यांतील खासदारांनी या विषयाचा पाठपुरावा करावा, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.