
पूर्वांचलातील लोकांना ‘चिकी’ नावाने हाक मारल्यास तुम्हाला पाच वर्षांचा तुरुंगवास घडू शकतो. हा कायदा खूप उशीरा आणण्यात आला का? किवा हा कायदा फारच कडक आहे का? याचा आपण शोध घेऊ………
पूर्वांचलातील लोकांना ‘चिकी’ नावाने हाक मारल्यास तुम्हाला पाच वर्षांचा तुरुंगवास घडू शकतो. हा कायदा खूप उशीरा आणण्यात आला का? किवा हा कायदा फारच कडक आहे का? याचा आपण शोध घेऊ………
पूर्वांचलातील लोकांविरुद्ध असलेला वांशिक वाद नष्ट करण्यासाठी अखेर गृह मंत्रालयाने एक कायदा केला. सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असा आदेश दिला आहे की, पूर्वांचलातील लोकांवर जो कोणी वांशिक अत्याचार करेल, त्या अपराधी व्यक्तीस पाच वर्षे तुरुंगात टाका. या नवीन आदेशाचे विद्यार्थी समूहाने स्वागत केले असून ‘पूर्वांचलातील जनतेला अखेर न्याय मिळाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर, काहींच्या मते हा कायदा खूपच कडक करण्यात आलेला आहे.
तेनझिन येशी या पूर्वांचलातील विद्यार्थीनीने पुणे शहराला तिचे घर मानले आहे. तिच्या असे लक्षात आले की, सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांच्या जातीवरून टोमणे मारले जात होते. त्यांचा तिरस्कार केला जात असे.
‘‘पुण्यास येण्याचा आमचा निर्णय योग्य होता का, या बद्दल आम्हालाच खात्री वाटत नव्हती. पुण्यात फेरफटका मारण्यास जाण्याची आम्हाला भीती वाटत असे. आम्ही भारतीय आहोत. आणि आम्हालाही समान हक्क आहेत. लांच्छनास्पद वागणूक आम्ही का म्हणून स्वीकारायची? जे कोणी आम्हाला ‘नेपचा’ किवा ‘चिकी’ म्हणून चिडवतात, त्यांना जरब बसविण्यासाठी हा कायदा अतिशय योग्य आहे.’’असे तेनझिनने म्हटले.
वाडिया महाविद्यालयात शिक्षण घेणारी चिकित्सा मानसशास्त्राची विद्यार्थीनी दीपाला छेत्री म्हणते की, ज्या ज्या वेळी आम्ही एकत्रितपणे जात असतो, त्या त्या वेळी काही लोक बदनामीकारक शरेबाजी आमच्याकडे बघून मारत असत. केवळ आम्ही दिसायला थोडेसे वेगळे आहोत म्हणून, कोणालाही आमची टिंगलटवाळी करण्याचा अधिकार दिलेला नाही. भारतासारख्या लोकशाही देशात आम्हाला देशाच्या कोणत्याही भागात जाऊन काम करण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. आणि आम्हालाही समान प्रतिष्ठेची वागणूक मिळाली पाहिजे.
दीपाली आणि तेनझिन यांच्या सारख्या अनेक विद्यार्थीनी असतील की, ज्यांना वाटते, त्यांना या पुण्यात ‘लक्ष्य’ केले जात आहे. जातीय, वांशिक भेदभाव पाळला जात आहे. आणि म्हणून हा नवीन कायदा म्हणजे ‘स्वागतार्ह बदल’ या शब्दांत त्याचे स्वागत करीत आहेत.
पेम्पा वाँग्मो या पुण्यात गेल्या चार वर्षांपासून आहेत. व ब्युटी सलूनमध्ये काम करतात. त्या म्हणाल्या की, जेव्हा लोक आम्हाला हिणवण्याच्या उद्देशाने हाका मारतात, तेव्हा अतिशय वाईट वाटते.
चार वर्षांपूर्वी जेव्हा मेयाँग चँगने प्रथमच ‘रियालिटी शो’मध्ये पदार्पण केले, तेव्हा प्रेक्षकवर्ग निराश झाला होता. ‘‘मी भारतीय आहे आणि येथे मी माझे सगळे आयुष्य घालविले आहे. परंतु, मला असे वाटते की, लोक विशिष्ट पद्धतीने लोकांना संबोधतात. हे अगदी स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, आपण बाँग आणि सरदार म्हणतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कडक कायद्याची अंमलबजावणी करणे, हे अगदी गंमतीशीर म्हणावे लागेल, असे तो म्हणाला.
अभिनेत्री उदिता गोस्वामी हिला वाटते की, हा कायदा खूपच कडक आहे. परंतु, तिला वाटते की, लोक कसे दिसतात, त्या वरून त्यांना नाव पाडणे व त्या नावाने हाका मारणे हे अतिशय चुकीचे आहे. इतकेच नव्हे तर, नेपाळींना ‘बहादूर’ असे म्हटले जाते. या सर्व गोष्टींना कोठेच शेवट नाही.
“एक जबाबदार नागरिक आणि एक माणूस या नात्याने याकडे पाहून जनजाग्रती केल्यास वेगळे चित्र पाहावयास मिळेल. लोकांना ते कोणत्या वंशाचे आहेत, या वरून संबोधणे हे काही शहाणपणाचे नाही. त्यामुळे तुम्हीच मूर्ख व इडियट असल्याचे दिसून येते,‘‘ असे गोस्वामी म्हणाली.
बॅडमिटनपटू ज्वाला गुत्ता यांच्यासारखे इतरही काही आहेत. त्यांना वाटते, कठोर अशा कायद्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा विविध राज्यांची संस्कृती व समाजातील चालीरीतींविषयी लोकांना अधिक माहिती करून देणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
‘‘आम्हाला आमचे मूलभूत हक्क प्रथम मिळाले पाहिजेत. पूर्वांचलातील लोक हे काही चिनी नाहीत. ते भारतीय आहेत.’’, असे मत गुत्ता यांनी व्यक्त केले. गुत्ता यांच्याप्रमाणे चँग यांनीही वाटते की, पूर्वांचल हा सर्वप्रथम भारताचा अविभाज्य भाग मानला गेला पाहिजे. कायद्याचा धाक दाखवून, शिक्षा करून पूर्वांचलातील जनतेविषयीचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलणार नाही.