
चेन्नई दि.९-यंदाच्या वर्षी आय.टी.कंपन्यांनी आपली कॅम्पस भरती सप्टेंबरपर्यंत लांबविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.इंजिनिअरिंग कॉलेजातून यंदा मुलाखतींसाठी जाण्यास कांही महत्त्वाच्या बाबींमुळे वेळ मिळाला नसल्याचे कारण यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागतिक मंदीची झळ आय.टी.कंपन्यांनाही आता जाणवू लागली असल्याने कॅम्पस मुलाखती उशीरा घेण्याकडे कंपन्यांचा कल आहे.