
इस्लामाबाद दि.६- गेले दोन वर्षे पाकिस्तानातून भारतीय केळ्यांना असलेल्या मागणीत वाढच होत असून ही केळी पाकिस्तानात २०० रू. डझन भावाने विकली जात आहेत असे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानचा सिंध प्रांत हा केळ्यांचे आगार म्हणून ओळखला जातो.मात्र गेली दोन वर्षे सततचे पूर आणि वातावरणात वाढलेला गारवा यामुळे येथे केळ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी भारतातून केळ्यांची आयात केली जात आहे. सुरवातीला पंजाब प्रांतातूनच ही केळी निर्यात होत होती मात्र आता भारतातील अनेक राज्यातून केळी निर्यात केली जात आहे.