
नुकत्याच जाहीर झालेल्या चौथ्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ५.३ टक्के विकासाने सरकारची झोप उडवली आहे. जीडीपीचा दर गेल्या ९ वर्षात सर्वात कमी ठरला असून, अर्थव्यवस्थेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय औद्योगिक संघटनेने (सी.आय.आय.) ने केली आहे.
