चंद्रचूड सिंह परतणार लवकरच बॉलिवूडमध्ये

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता चंद्रचूडसिंह आजारपणामुळे बॉलीवूडपासून दूर राहिला होता. आता त्याला थोडेसे रिलॅक्स वाटत असल्याने पुन्हा तो छोट्या पडद्याच्या माध्यमातून परत लवकरच पुनरागमन करीत आहे.

२००१ रोजी बॉलीवूडमध्ये त्याचा शेवटचा चित्रपट झळकला होता. त्यानंतर त्याला आजारपणामुळे बॉलीवूडपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्याच्या आजारावरील उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला प्रदीर्घ विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्याने प्रदीर्घ काळ विश्रांती घेतली. २००१ साली त्यांनी ‘आमदानी आठानी खर्चा रूपया’ या चित्रपटानंतर त्याने बॉलीवूडमध्ये काम करणे बंद केले होते.

त्यापूर्वी चंद्रचूड सिंहने ‘माचीस’, ‘जोश’, ‘तेरे मेरे सपने’, ‘क्या कहना’ या चित्रपटांत काम केले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने काही काळ बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजविले होते. दहा वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तो बॉलीवूडमध्ये येत आहे.

यापूर्वीचा अनुभव पाहता तो चित्रपटसृष्टीत काम करण्यात यशस्वी होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वीचा कामाचा अनुभव व आता करावे लागणारे काम यामध्ये खूपच फरक आहे. त्यामुळे आता काम करताना त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. सध्या त्याला छोट्या पडद्यावरील मालिकेत काम मिळाले आहे व काही बॉलीवूडमधील चित्रपटाच्या ऑफरही त्याच्याकडे आहेत. मात आता तो विचार करूनच चित्रपट स्वीकारणार असल्याचे समजते.

Leave a Comment