
पुणे, दि.१ – अरबी समुद्रातील ‘अँटी-सायक्लोन’ स्थितीमुळे मान्सूनच्या वार्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीकडून धडकलेल्या मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच येत्या काही दिवसात अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
