
प्रेक्षकांइतकीच बॉलीवूडवासीयांनाही आमिर खानच्या चित्रपटाची उत्सुकता असते; पण ‘सत्यमेव जयते’ या आपल्या महत्त्वाकांक्षी शोमुळे आमिरने ‘तलाश’चे प्रदर्शन पुढे ढकलले. सत्यमेव जयतेच्या प्रमोशनसाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच या शोद्वारे समोर आलेल्या समस्यांवर योग्य विचारविर्मश करायला वाव मिळावा यासाठी आमिरने जून महिन्यात प्रदर्शित `तलाश’चे प्रदर्शन नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले होते.