
भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणार असतील तर त्यात खेळायला आपल्याला आवडेल असे भारतीय संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने सांगितले आहे. या दोन देशांत क्रिकेट सामने झाले तर ते दोन्ही देशांच्या हिताचे ठरेल असे सांगून तो म्हणाला की मुंबईवरील हल्ल्यानंतर या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. मोहालीत विश्वकप सामन्यातील उपांत्य सामना भारत पाकिस्तानच्या संघात झाला आणि त्यात भारत विजयी झाला होता. त्यानंतर या दोन्ही देशांत सामने झालेले नाहीत.