
नवी दिल्ली, दि. ३१ – केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने राष्ट्रीय दूरसंचार धोरण – २०१२ ला मंजूरी दिली आहे. या धोरणानुसार आता देशभरात कोठेही प्रवास करताना ग्राहकांना मोबाईलचे रोमिंग शुल्क भरावे लागणार नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री अंबिका सोनी यांनी गुरूवारी या निर्णयाची माहिती दिली.
