
नागपूर, दि. २९ – रक्तपाताविना क्रांती शक्य नसून देशाच्या संरक्षणासाठी अहिंसा कुचकामी ठरते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळेच १९३७ साली इंग्रजांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी गांधींच्या हिंदी राष्ट्र आणि अहिंसा या दोन्ही संकल्पना नाकारल्या. अहिंसा ही कुठल्याही काळात प्रभावी होऊच शकत नाही. अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या अहिंसात्मक मार्गाची राज्यकर्ते गळचेपी करीत आहेत. जर अण्णा हजारे यांनी सावरकरांचा मार्ग स्वीकारला तर त्यांना हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कलावंत शरद पोंक्षे यांनी केले.