
डोळ्यातील अंधारावर मात करीत जिद्दी आणि चिकटीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत विक्रमी यश मिळविणार्या राहूलने सार्यांची मने जिंकली. वाणिज्य शाखेत आतापर्यंतच्या इतिहासात कुणीही इतके गुण मिळवले नाही. त्याच्या या ऐतिहासिक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल हा डॉक्टरपुत्र आहे. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात तो शिकतो. लहानपणापासूनच ९० टक्के आंधळा असणार्या राहूलने वाणिज्य शाखेत विक्रमी ९५ टक्के गुण मिळवून अंधारवाटेवर प्रकाशाची पेरणी केली.
