
वाशीम, दि. २५- अण्णा हजारे यांच्या दौर्यादरम्यान मंगरुळनाथ येथील शारदा पाटील नावाच्या एका गरीब महिलेने अण्णांच्या या चळवळीत आपलेही काही योगदान असावे या हेतूने पै पै जोडून जमा केलेले १५ हजार रुपयांचे ५ ग्रॅम सोने अण्णांच्या झोळीत टाकले. मात्र, अण्णांना हे कळताच त्यांनी या गरीब महिलेचे सोने परत करण्यास सांगून तिच्या भावना आम्ही स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यानुसार भ्रविजच्या कार्यकर्त्यांनी मंगरूळनाथ येथे जाऊन या गरीब महिलेचे सोने तिला परत केले.