
सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी आमिर खानने त्याची लोकप्रियता वापरली, तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न चित्रपट निर्माता शेखर कपूर यांनी टीकाकारांना विचारला आहे. दोन आठवड्यांतच या कार्यक्रमाने सामाजिक विषयांबाबत जागृत होण्यास भाग पाडले. काही वेळातच हा कार्यक्रम हिट ठरला. त्यानंतर लगेचच विविध मुद्यांवरून सत्यमेव जयते आणि आमिर खान दोघेही वादात अडकले.