अमिरखानने कॉपी केल्याचा राखी सावंतचा आरोप

राखी सावंत म्हटलं की वादच आला. पण आता नव्याने आणखी एक वाद राखीने उकरून काढला आहे. अमिरखानचा नव्याने सुरू झालेला ‘सत्यमेव जयते’ हा रिऍलिटी शो हा राखी सावंतच्या ‘राखी का इन्साफ’ या रिऍलिटीचा कॉपी आहे, असा आरोप केला आहे. अमिरने मी सुरू केलेल्या रिऍलिटी शो ची कन्सेप्ट चोरली आहे.

मी माझ्या शो च्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचाही फुटली होती. शो मधून लोकांचे अनेक प्रश्‍न बघून मला दु:ख वाटत होते. या दु:खामुळे मला कितीतरी वेळा रडू कोसळले होते. त्यामुळे मी डिप्रेशन आल्याने काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे माझा शो काही काळासाठी बंद होता. त्याच माझ्या शोची कन्सेप्ट अमिरने चोरली आहे. त्याने सुरू केलेल्या शो ला प्रेक्षक जरी सामाजिक चळवळ म्हणत आहेत.

दुसरीकडे माझ्या शो ला याच प्रेक्षक वर्गाने आयटम गर्लचा शो म्हणून हेटाळणी केली. एका शो नंतरच अमिरला सोशल वर्कर म्हटले जात आहे. केवळ राखी वाईट वाटते म्हणून माझी व माझ्या शो ची काही प्रेक्षकांनी बदनामी केली. तीच मंडळी आता अमिरला डोक्यावर घेत असल्याचा आरोपही तिने केला.

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणार्‍या राखी सावंतला आता या शो च्या माध्यमातून पुन्हा चर्चेत राहण्याची संधी आली आहे, तिचा फायदा ती करून घेणार हे मात्र नक्की.

Leave a Comment