स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेसाठी आमीरला महाराष्ट्र शासनाचे आमंत्रण

मुंबई दि.११ – आपल्या पहिल्यावहिल्या बहुचर्चित टिव्ही शोमधून स्त्रीभ्रूण हत्येसारखा गंभीर विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलेल्या आमीरखानला स्त्रीभ्रूण हत्याविरोधातील मोहिमेत सामील व्हावे असे आमंत्रण महाराष्ट्र शासनाने दिले असल्याचे समजते. राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी तसे पत्रच आमीरला लिहिले आहे. या पत्रात सरकार या विषयासंदर्भात चालवित असलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली आहे तसेच त्याला त्याच्या टिव्ही शो साठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
  आमीरच्या सत्येमव जयते या गेल्या रविवारपासून सुरू झालेल्या टिव्ही शोला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे व त्याची देशभर वाहवा केली जात आहे. सरकारी पातळीवरही या कार्यक्रमाची दखल घेतली गेली असून राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही आमीरने नुकतीच भेट घेतली. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश सरकारनेही आमीरला आमंत्रण केले आहे. आमीर महाराष्ट्राचाच रहिवासी असल्याने महाराष्ट्र शासनानेही या कामी त्याची मदत घेण्याचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment