![](https://www.majhapaper.com/wp-content/uploads/11_5.jpg)
मुंबई, दि. २० – वैश्य सहकारी बँकेला २०११-१२ या आर्थिक वर्षात एक कोटी रूपयांचा नफा झाला. तसेच बँकेच्या ठेवींनीही १०० कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. २००९-१० मध्ये बँकेला ८५ लाख रूपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली असून, यामुळे बँकेने भागधारकांना १० टक्के दराने लाभांश देण्याची शिफारस केली आहे.