
नवी दिल्ली, दि. ०८ मार्च – २०१२ राष्ट्रीय पुरस्कारची घोषणा राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आली. या पुरस्कारात बाजी मारली ते मराठी चित्रपटांनी. ‘देऊळ‘, ‘शाळा‘ आणि ‘बालगंधर्व‘ या तीन मराठी चित्रपटांनी तब्बल आठ पुरस्कार पटकवत मराठीचा झेंडा डौलाने फडकवला आहे. तसेच ‘देऊळ‘ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि याच चित्रपटातील गिरीष कुलकर्णी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता‘ तर ‘बुंबाट‘ विद्या बालनला ‘दी डर्टी पिक्चर‘साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावजण्यात आले.