एकताने लग्न करावे जितेंद्राची इच्छा

एकता कपूर सध्या यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. मागील अनेक वर्षांपासून ती या क्षेत्राशी निगडीत आहे. तिच्या अखंड मेहनतीच्या बळावरच तिने हे स्थान मिळविले आहे. एकताची निर्मीती असलेला ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटाचे नुकतेच  ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या हस्ते  म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी अभिनेते जितेंद्र, चित्रपटाचे कलाकार तुषार कपूर, कुलराज रंधावा, उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केले आहे.
 तिचे कौतूक करतांना जितेंद्र म्हणाले, ‘एकताकडे मेहनत करण्याची अदभूत क्षमता आहे. एवढी मेहनत करण्याची तयारी मला सध्याच्या कोणत्याच निर्मात्यांमध्ये दिसत नाही. मी एका मध्यमवर्गीय परिवारातून आलेलो आहे. त्यामुळे मला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी अखंड संघर्ष करावा लागला. तोच उत्साह एकतामध्ये आहे, आणि त्यामुळे ती अजूनही संघर्षरत आहे.  ती तिचे आयुष्य ऐषोरामात घालवू शकत होती, मात्र तिने तो रस्ता धरला नाही. मला वाटते तुमच्यात जर प्रतिभा असेल, काम करण्याची उर्मी असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सामान्य पित्याप्रमाणे जितेंद्र यांच्याही मनात आता मुलीच्या कन्यादानाचा विचार घोळु लागला आहे.  ते म्हणाले, प्रत्येक पित्याची जी इच्छा असते तीच माझी इच्छा आहे. एकता जेव्हा मानसिकदृष्टया स्वतंत्र होईल तेव्हा ती घर – लग्न याबद्दल विचार करेल. यासाठी माझ्या सोबत तुम्हीसुध्दा प्रार्थना करा की, ती लवकरात लवकर मानसिकदृष्या स्वतंत्र होउन लग्नाचा निर्णय घेइल.

Leave a Comment