
नवी दिल्ली – प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना आखणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षणाचा कालावधी ९० दिवसांवरून वाढवून १२० दिवसांचा केला आहे. १० मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नवी दिल्ली येथे रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.