
जर्हॉ डाल डाल पर सोनेरी चिडिया करती बसेरा, हो भारत देश है मेरा ।हे हिदी पद आम्हाला लहानपणी फार आवडत असे.त्याची सध्या सकाळ दुपार आठवण होते आहे. त्या हिदी गाण्यात या देशातील समाज किती उच्च जीवनमूल्ये पाळतो आणि आपल्या शेजारी, आजूबाजूला राहणार्यांची सेवा करतो याचेही वर्णन आहे. सध्या पुण्यात आणि पश्चम महाराष्ट्रात पदोपदी याची प्रचीती येत आहे. कारण बहुतेक चौकात ‘काशीयात्रेला चला, अष्टविनायकाला चला, नाशिक त्र्यंबकेश्वराला चला, असे बोर्ड लागलेले दिसतात.अर्थात ही सारी तीर्थाटणे विनामूल्य असतात. काशीरामेश्वर, चारीधाम, गंगासागर, हरिद्वार, तीर्थराज प्रयाग, नया,बारा ज्योतिर्लिंग, यांच्या विनामूल्य यांत्रांचे बोर्ड चार महिन्यापूर्वी लागलेले दिसायचे. आता ते कमी झाले आहेत. आता विनामूल्य डोळे तपासणी, विनामूल्य चष्मे, विनामूल्ये दवाखाने, महिलांना साडया, मुलांला कपडे, तरुण मुलासाठी संगणकशिक्षणाचे विनामूल्य वर्ग अशा पाट्यांची संख्या मोठी आहेपुण्यात संगणकतंत्र आत्मसात करणाराला बर्यापैकी पगाराची नोकरी मिळते आणि गरीबांना त्यांचे प्रशिक्षण परवडत नाही अशा वेळी त्यांना विनामूल्य शिक्षण देणारी मंडळी मोठ्या संख्येने पुढे आली आहेत. असे हे दान करणारी मंडळी कोण याची चौकशही फारशी करावी लागली नाही कारण गेल्या गणपतीपासून ज्यांचे वाढदिवस जाहीरपणे साजरे झाले व ज्यांच्या वाढदिवसासाठी चौकाचौकात त्यंाची छायाचित्रे असलेले फ्लेक्स लावलेले होते तीच ही मंडळी होती.