
गेल्या सहा महिन्यातील महागाई वाढीच्या प्रमाणाने सामान्य माणसाला जगणे तर कठीण केले आहेच पण त्यातून काही मार्गही दिसेनासा झाला आहे. या महागाईला जशी जागतिक कारणे आहेत तेवढीच महत्वाची कारणे आपल्याकडील धान्य व्यापारात सट्टेबाजी सुरु झाल्याची आहेत. याविरोधात आवाज उठवणे सुरु झाले तर महागाई व भ्रष्टाचार यातून मार्ग निघायला आरंभ होअू शकतो,असे भारतीय मजदूर संघ या भारतातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे उपाध्यक्ष श्री उदयराव पटवर्धन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, भ्रष्टाचार आणि महागाई यांनी सामान्य माणसाचे दैनंदिनी जीवन अतिशय त्रस्त झाले आहे असे वाक्य खेड्यात, शहरात, रेल्वेप्लॅटफार्मवर, मंडईत,मुलांच्या शाळांच्या दाराशी जमलेल्या पालकांच्या तोंडी अणि अगदी स्शमानभूमीतही जेथे चार माणसे एकत्र जमतात तेथे ऐकू येअू लागले आहे पण त्यातील एक बाब विसरता येणार नाही की, ती आपणच बदलण्याचा प्रयत्न केला तरच बदलेल. अन्यथा ही परिस्थिती अधिकच वाईट होत जाईल. आपला संबंध भ्रष्टाचारापेक्षा महागाईशी अधिक येतो त्यात तरुण पिढीने आंदोलन या दृष्टीकोनातून न पडता अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून पडावे.
मोठया मोठया रकमेसाठी आपण ज्या नोटा वापरतो ती साधे कागदाचे तुकडे असतात तरीही त्या देअून किमती वस्तू मिळत असतात. पूर्वी प्रत्येक नोटेसाठी बँकेत तेवढे सोने ठेवले जात असे म्हणून सोन्याच्या नाण्याऐवजी कागदाचा चेक किवा नोटा असे करणे सुरु झाले. पण तो विषय आता सोन्याऐवजी राष्ट*ीय उत्पन्नाशी निगडीत केल्याने व या उत्पादनाचे महत्वही सट्ट्यावर ठरू लागल्याने आपण वापरत असलेल्या नोटंाच्या किमती सतत घसरू लागल्या आहेत, असे सांगताना श्री पटवर्धन म्हणाले, गेल्या पाच सहा वर्षात जगातील महत्वाच्या देशांनी मोठ्या प्रमाणात उत्पादने करणे सुरु केले पण अशी उत्पादने केली व खपली नाहीत तर त्या वस्तूंना गिर्हाईक मिळाले नाहीत तर एका बाजूला त्या उत्पादनाच्या किमतीच्या आधारे नोटा छापणे सुरु झाले आणि प्रत्यक्षात ते उत्पादन पडून नोटांची किमत घसरली. या अर्थनीतीमुळे जगातील अनेक मोठमोठ्या देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. आपण आपल्या देशातील समस्यांचा विचार करताना जगातील ज्या बार्बीचा आपल्यावर परिणाम झाला आहे त्याचा आपल्या तरुणांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.
सध्या भ्रष्टाचार आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलने करण्याचा काळ आला आहे. अशा आंदोलनात कसे सहभागी व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवावे पण महत्वाची गोष्ट एक लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे भ्रष्टाचार आणि महागाई हे कसे वाढतात यावर अभ्यास करणार्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असे सांगताना श्री पटवर्धन म्हणाले, अभ्यास करून केलेली आंदोलने ही अचूक असतात. भ्रष्टाचारी व महागाईस कारणीभूत असणारे त्यांच्या त्यांच्या उद्दिष्टासाठी काही आकडेवारी आपल्या तोंडावर फेकतात आणि आपण निरुत्तर होतो, ती खरी वाटते पण सखोल अभ्यास करणारे तरुण पुढे आले तर त्याला सडेतोड उत्तर मिळेल. (नुकतीच उडदाचा साठा दोन लाख टन असताना वीस लाख टनाचा साठा विक्री दाखविली होती त्यामुळे व्यापार्यांची खरेदी तीस रुपये व विक्री ५६ रुपये झाली होती. हरबर्याच्या डाळीबाबत टन साठा साठ लाख टन असताना तो असताना सातशे बेचाळीस लाख टन दाखवला आणि किमतीने विक्री झाली. डाळीची व्यापार्यांची खरेदी सोळा रुपये व विक्री बत्तीस रुपये झाली होती, अशी माहिती पुणे वार्तापत्रात दिली होती.).औद्योगिक विश्वाबाबत असा सट्टा पूर्वीपासून आहे पण आता तो धान्य,फळे आणि अन्नपदार्थ यांच्याबाबत सुरु झाला आहे. याबाबत ते म्हणाले, शेतात किती पीक आले त्याचा लोकांनी काय भाव द्यायचा याच्याशी संबंध राहिलेला नाही. एका बाजूला प्रचंड साठे असले तरी सट्टा विकत घेण्याच्या नावाखाली प्रचंड टंचाई निर्माण केली जाते आणि आपल्या खात्यावर प्रचंड साठे आहेत असे दाखवून बाजारपेठेतील भाव पाडले जात आहेत. या विषयाकडे तरुणांनी अभ्यासपूर्ण बघितले नाही तर या समाजाला भवितव्य कसे राहणार ?
.पेट*ोलच्या वाढत्या किमती हा तर प्रत्येक मिनिटाचा महत्वाचा विषय झाला आहे. पण त्यातून बाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग हाताळायचे ठरविले तरच मार्ग निघणार आहे ना ? आजही देशात इथेनॉल तयार होअू शकत आहे पण त्याला पूरक असे धोरणच येथे नाही त्यामुळे ते उत्पादक अडचणीत आले आहेत.अजूनही इंधन निर्मितीचे अनेक स्रोत अुपलब्ध होणे शक्य आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वात महत्वाच म्हणजे दररोज काही लाख मोटारी रस्त्यावर हिडत आहेत त्याऐवजी संबंधिताना तो प्रवास बसमधून करण्याच्या सोयी झाल्या देशातील निम्मे इंधन वाचणार आहे.
पूर्वी जगात सोन्याच्या आधारे नोटा छापायची पद्धती होती ती दुसर्या महायुद्धापूर्वी जे एमकेन्स (ऊी.ग च घशूपशी) या अर्थक्षेत्रातील विचारवंताच्या सिद्धांतामुळे त्या त्या देशात निर्माण होणार्या उत्पादनाच्या आधारे नोटा छापल्या जावू लागल्या. ती प्रथम आकर्षक वाटली पण उत्पादने निर्माण होवून जेंव्हा ती पडून राहू लागली तेव्हा त्याच्या आधारे छापलेल्या त्या त्या देशाच्या नोटाही कमी किमतीच्या झाल्या. सध्या जगातील अर्थिक समस्येचे ते एक कारण आहे. सध्या जगभर अशा उत्पादनातून राष्ट*ीय घरेलू उत्पादन म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ।जीडीपी। ठरते आणि त्याच्या किमतीतून राष्ट*ीय उत्पन्न ठरत असते. पण जगभर अशी उत्पादने मोठ्या प्रमाणावर उत्पादने पडून राहिल्यामुळे त्या त्या देशाच्या नोटांची किमत आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात काही ताळमेळ राहिला नाही. पाश्चात्य देशांना पूर्वीपासून मोठी उत्पादने व त्यांच्या साठ्याच्या आधारे जगाच्या बाजारपेठेचा ताबा घेण्याची सवय आहे आज ती सवय त्यांची अर्थव्यवस्था कोसळण्यास कारणीभूत ठरणारी झाली आहे.
अशा व्यवस्थेतून त्या त्या देशाच्या उत्पादनक्षमतेनुसार व बाजारपेठ मिळवण्याच्या कौशल्यानुसार त्यंाची अर्थव्यवस्थचे प्रकार पडतात. सध्या त्यात खरी अर्थव्यवस्था ही सर्वात महत्वाची ठरते. त्यालाच रिअल इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे तो देश प्रचंड प्रमाणात उत्पादने करतो आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवतो. त्याच्यापेक्षा कांहीशी निराळी अशी अर्थव्यवस्था म्हणजे व्हच्युअल इकानॉमी, की जी जगात आघाडीच्या देशातील निरनिराळी कामे करून अर्थव्यवस्था उभी करते. भारतीय तरुणांनी गेल्या वीस वर्षात निरनिराळ्या सेवा देवून पन्नास अब्ज डॉलर्स येवढी रक्कम निरनिराळ्या संगणकीय किवा अन्य क्षेत्रातील सेवा देवून मिळवले आहेत. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील आयातनिर्यातीतील फरक भरून काढण्यास मोठा उपयोग झाला आहे. पण चीनची इकॉनॉमी जशी उत्पादनाच्या आधारे दिसू शकते तशी भारतीय इकॉनॉमी दिसू शकत नाही. यापेक्षा तिसरी एक अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे कॅसिनो इकॉनॉमी. अमेरिका, युरोपातील बहुतेक देश त्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण आहे. एखाद्या वस्तूचे उत्पादन मूल्य त्याच्या आवश्यकतेनुसार,टंचाईनुसार आणि कारणापेक्षा अधिक साठा असण्याच्या शक्यतेनुसार बदलत असते. गेल्या शंभर वर्षात अमेरिका या देशाने जगावर अर्थिक साम्राज्य केले ते प्रामुख्याने अशा स्वरुपाच्या अर्थव्यवस्थेच्या आधारे केले. पण गेल्या दोन वर्षात त्या सार्या देशांना मंदीची मोठी झळ पोहोचली आहे ती अशा अर्थव्यवस्थेमुळे. जगात रिअर ईकॉनॉमी ही उत्कृष्ट मानली जाते. भारताची व्हर्च्युअल इकॉनॉमी ही मध्यम मानली जाते व कॅसिनो इकॉनॉमी ही फसवी इकॉनॉमी मानली जाते.
मोठ्या देशांच्या प्रभावामुळे आपण त्या फसव्या कॅसिनो अर्थव्यवस्थेचा भाग बनू लागलो आहोत. जे श्रीमंत देश अन्य गरीब देशांतील उत्पादनाच्या जोरावर जगातील महागाई ठरवितात त्या पद्धतीने आपण आपल्या देशातील निम्म्या लोकांच्या उत्पादनाच्या आधारे भ्रष्टाचार व महागाई ठरवत आहोत. ही परिस्थिती आपणच बदलली पाहिजे. त्यासाठी या देशातील तरुणंानी आघाडी उघडली पाहिजे.
– मोरेश्वर जोशी, पुणे