अडवानींची जनचेतना यात्रा पुण्यात

पुणे,दि.३- या देशातील तरुणांनी आणि प्रतिभावंतानी केलेल्या प्रयत्नामुळे दोन वर्षापूवींपर्यंत असे वाटत होते की,हा देश लवकरच महासत्ता होण्याच्या जवळ जावू शकतो पण गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचार आणि महागाई यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे तर मोडले आहेच पण विकासाचेही कंबरडे मोडले आहे. हे वातावरण पुन्हा बदलवण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यानी आज त्यांच्या जनचेतना यात्रेतील पुण्याच्या जाहीर सभेत सांगितले. या जनचेनता यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सायंकाळी चार वाजता पोहोचणारी जनचेतना यात्रा साडे आठ वाजता पोहोचली. रात्री दहा वाजल्यामुळे व महाराष्ट*ात नियम असलयाने लालजी अडवानी यंाना भाषण आवरते घ्यावे लागले. न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोडवरील विशाल प्रांगणात झालेल्या सभेस मोठा प्रतिसाद होता व सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सभा तुडंब भरली होती. सभेत भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथजी मुंडे, प्रदेश अध्यक्ष मानगुंटीवार, शहरअध्यक्ष विकास मठकरी, यात्रा व्यवस्थापक शाम जाजू यांचीही भाषणे झाली.
श्री अडवानी आपल्या भाषणात म्हणाले, मी करत असलेली ही सातवी राष्ट*ीय यात्रा असली तरी या यात्रेला जो प्रतिसाद मिळत आहे तो प्रचंड मोठा आहे. कारण गेल्या दोन वर्षात जनतेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त तर आहेच पण देशाच्या स्थितीबाबत चितीत आहे. मी ही यात्रा सुरु केली तेंव्हा कॉग्रेसच्या प्रवक्त्यांनी माझी टिगल उडविली की, अशा यात्रेची गरज अडवानींना त्यांचे राजकीय भवितव्य अधिक बळकट करण्यासाठी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मला, माझ्या पक्षाला अशा पद्धतीने राजकीय परिस्थिती बळकट करण्यासाठी यात्रेची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या दृष्टीनेही काढलेली नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात येत आहे की, देशातील जबाबदार नागरीक सध्याच्या स्थितीने अतिशय व्यथित आहे. त्यामुळे अशा यात्रेतून पुन्हा अर्थिक प्रगतीला गती येण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
सरकारचे अनेक प्रतिनिधी आज तुरुंगात आहेत प्रत्येक कॉग्रेस नेत्यावर कोणता ना कोणता तरी आरोप होत आहे ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंतचा अनुभव असा की, सुशासन आणि भ्रष्टाचार हे एकत्र कधी नांदू शकत नाहीत. त्याच प्रमाणे लोकशाही व परिवारवाद हेही एकत्र नांदू शकत नाहीत.
भारताचे विदेशातील बॅकंामधून असलेले काही लाख कोटीचा कोटीचा काळा पैसा परत आणण्याची आवश्यकता मी या यात्रेत प्रामुख्याने मांडत आहे तेंव्हा काँग्रेसचे काही लोक जाहीरपणे असा प्रश्न विचारतात की, भाजपाचे शासन होते तेंव्हा कांही लाख कोटी रुपये परदेशी बँकात असलेला काळा पैसा काही नाही आणला, अशा वेळी त्यांना जाणीव करून द्यावी लागत आहे की, जागतिक बँक गोपनीयतेच्या कायद्यात तीन वर्षापूर्वी बदल झाला त्यामुळे अमेरिका, जर्मनी, ब्राझील अशा अनेक देशांनी त्यंाच्या देशाचा विदेशी बँकातील काळा पैसा नेला. भारत हा असा एकमेव देश आहे की ज्या देशातील सरकारने त्याची दखल घेतली नाही. भारताने हा पैसा परत आणावा म्हणून सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. वास्तविक देशाचे पंतप्रधान डॉ मनमोहन ंसंग हे जाणकार अर्थतज्ञ आहेत तरीही ते देशाच्या हिताचे निर्णय घेताना मात्र दिसत नाहीत.
 श्री अडवानी यांच्या भाषणापूर्वी आपल्या भाषणात बोलताना पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले, गेल्या वेळच्या लोकसभेतील सरकारवर अविश्वासाचा ठराव आला असताना या सरकारने पैसे चारून सतरा खासदार विकत घेतले. ही वस्तुस्थिी असली तरी ज्या भाजपाच्या खासदारांनी आणि सुधिद्र कुलकर्णीं यांच्या सारख्या वरीष्ठ व्यक्तीने हे प्रकरण उजेडात आणले त्यानाच आज सरकारने तुरुंगात पाठवले आहे ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे म्हणून मी लालकृष्णजी अडवानी यंाना विनंती केली त्यांनी याबाबत जनचेतना यात्रा काढावी,त्याप्रमाणे त्यानी तशी यात्रा काढली आणि जनतेनेही प्रचंड प्रतिसाद दिला हे जागृत लोकशाहीचे लक्षण आहे.
पुण्यात भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीर यांना विजय मिळाला याचे स्वागत करून भाजपानेते खासदार गोपीनाथ मुंडे आपल्या भाषणात म्हणाले, पुण्यातील लालमहालातील दादोजी कोंडेदेव यांचा पुतळा हलविल्याचा परिणाम राष्ट*वादीला भोगावा लागला आहे.