_1.jpg)
राळेगण सिद्धी,दि.२९- महाराष्ट्रातील लोकपाल कायदा मुख्यमंत्र्यापासून सामान्य कर्मचार्यापर्यंत प्रत्येकाला लागू व्हावा,यासाठी तीव्र आंदोलनाची जय्यत तयारी ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री अण्णा हजारे होते. दोन महिन्यापूर्वी झालेल्या राज्यसरकार व महाराष्ट्रातील अण्णा टीम यांच्या बैठकीत राज्यशासनानला हा निर्णय घेण्यासाठी एप्रिलपर्यंत मुदत देण्याचे ठरले होते. पण दरम्यानच्या काळात आंदोलनाची तयारी केली नाही तर पुन्हा हा विषय मुदत देण्याच्या दिशेने जातो. तशी वेळ येअू नये म्हणून तोपर्यंतच्या काळात राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यात तीव्र आंदोलनाची तयारी ठेवण्याचे ठरविण्यात आले त्यात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि आंदोलनात काय बाबी पाळायच्या आणि कोणत्या बाबी टाळायच्या याबाबतची स्पष्ट रूपरेखा कार्यकर्त्यांसमोर मांडण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना जनआंदोलन न्यासाचे सचीव अल्लाउद्दिन शेख म्हणाले, याचा पहिला टप्पा म्हणजे दि. १९ व २० नोहेंबररोजी राळेगणयेथे दोन दिवसाचे अभ्यासशिबीर असणार आहे. त्यानंतर राज्याच्या ३५१ तालुक्यात आंदोलनाची तयारी करण्यात येणार आहे. महाराष्ट* हे लोकपाल विधेयक पारीत करणारे हे पहिले राज्य असले तरी त्याची स्थिती हालाखीची आहे. त्या आयुक्तांना कसलेही अधिकार नाहीत. महत्वाचे म्हणजे भ्रष्टाचार्यांना त्याचा धाक वाटत नाही. त्या कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. पण त्यापूर्वी म्हणजे आगामी हिवाळी अधिवेशनातच तो बदल करावा अशी आमची मागणी आहे ते आम्ही राज्यातील सर्व तालुक्यात जाअून मांडणार आहोत पण तसे नाही झाले तर आंदोलनाची तयारी ठेवू व अन्य राज्यातही असे आंदोलन कसे करायचे याचा वस्तुपाठही येथे तयार करू.
महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची बैठक राळेगणच्या पद्मावती मंदिरात झाली. अण्णांचे मौन असल्याने ते आपले म्हणणे लिहून देत होते. ही बैठक चार तास चालली दरम्यानच्या काळात अण्णा टीमचे एक महत्वाचे सदस्य श्री अरविद केजरीवाल हे रविवारी राळेगणयेथे येणार असल्याचा निरोप आला व ते सध्या गाजियाबाद शनिवारी झालेल्या कोअरकमिटीचा वृत्तांत ते अण्णांना देतील व विचारविनिमय करतील,असेही सांगण्यात आले. चार तासाची बैठक संपल्यावर अण्णा हजारे बाहेर आले व भेटीस आलेल्यांना हाताने अभिवादन केले. त्यांची प्रकृती अजूनही अशक्त जाणवत आहे.