
गेले महिनाभर राळेगणसिद्धीला आलेले सेवाग्रामचे स्वरुप कांहीसे बदलून याच आठवड्यात अण्णाटीममधील दोन सदस्यांना मारहाण, दोन सदस्यांचे राजिनामे,राळेगणच्या मंडळींना राहूल गांधींनी भेटण्याचे जाहीर करून न भेटणे आणि अण्णा हजारे यांच्या हिद स्वराज्य ट*स्ट या संस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले चौकशीचे आदेश यामुळे आंदोलन ग्रामात झाले आहे. अण्णांच्या मौनामुळे हा गोंधळ कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे. अण्णा टीम फुटली अशी बातमी गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील न्यूयाँर्क टाईम्सने दिल्याने विद्यमान घटनांना अधिक महत्व आले आहे. पण अण्णांच्या यापूर्वीच्या आंदोलनातील अशीच ‘अण्णा टीम फुटण्याबाबतची माहिती ’ ज्याना माहिती आहे त्यांना अण्णा टीम फुटली असे कधीही वाटणार नाही. अण्णांनी दिल्लीतील पहिले मोठे उपोषण जंतरमंतरवर केल्याने राष्ट*ीय पातळीवरील समाजवादी संघटनामधील मंडळी व काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी करणारे सिव्हिल राईटस्वाले त्यांच्याभवती गोळा झाले होते त्यांना ‘अण्णांच्या आंदोलनाचा त्याना उपयोग करून घेता येत नाही, असे लक्षात आल्याने त्या सर्वांनी ‘भ्रमनिरास झाल्याचा जाहीरनामा’ काढला आणि एक एक बाहेर पडायला सुरुवात केली. यापूर्वी महाराष्ट*ात असे प्रकार घडले आहेत त्यात असे लक्षात आले आहे की, ही सारी मंडळी एकदम बाहेर पडत नाहीत. काहीजण बाहेरून हल्ले करतात व काहीजण आतून हल्ल्याला पूरक वातावरण करतात. स्वामी अग्निवेशयांच्यापासून ते मेधा पाटकर यांच्यापर्यंत एक बाब सर्वांच्या मनात समान असते ती ही की, राष्ट*वादी भूमिका असलेल्या रा.स्व.संघाने जर या आंदोलनात सहभाग घेतला तर यांना काही प्रभावही दाखवता येणार नाही त्यामुळे पहिल्या मिनिटापासूनच ही मंडळी ‘संघ या आंदोलनाचा ताबा घेत आहे’ अशी आवई उठवू लागली. जंतरमंतरवरील उपोषणात मंचावर जे भारतमातेचे पोस्टर लावले होते ते संघात लावल्या जाणार्या भारतमातेच्या चित्रासारखे आहे हाच काय तो पुरावा संबंधितांना मिळाला पण ते पोस्टर तर स्वामी अग्निवेश यांनी लावले होते हे स्पष्ट झाल्यावर त्यातीलही हवा निघून गेली. सध्या देशातील सर्व वृत्तपत्रे व वाहिन्या ‘अण्णा टीम फुटली’ असे मथळे देत असले तरी तशी वस्तुस्थिती नव्हती कारण यापूवींही अण्णा टीम नावाचा प्रकार कधी अस्तित्वातच नव्हता. सध्या जनलोकपालविधेयकाच्या मसुद्याच्या निर्मितीसाठी जरी अण्णाटीम तयार झाली असली तरी ‘अण्णा टीम’ हा अण्णांचा स्वभावच नाही.
ज्या पद्धतीने राळेगणला या आठवड्यात हरिद्वारचे फोन आणि मोबाईल वाढले आहेत ते लक्षात घेता ‘अण्णा आणि बाबा ’एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. पण त्याचा सामना करण्यापूर्वी अण्णांना येथे दोन बाबी निस्तराव्या लागणार आहेत. त्या म्हणजे हिद स्वराज्य ट*स्टची चौकशी आणि गो रा खैरनार यांनी अण्णांच्यावर केलेला ‘उपोषणात ते इलेक्ट*ाल घातलेले पाणी घेतात’ असा केलेला आरोप. तसे हे दोन्हीही मुद्दे छोटे आहेत त्यामुळे त्यांचे काही अडणारे नाही पण महाभारतयुद्धात धर्मराज युधिष्ठिराने ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली होती. त्यात कणभराची सोय निश्चत होती पण त्याचा परिणाम असा झाला की, धर्मराज युधिष्ठिर यांचा जमिनीपासून दोन इंच अधांतरी चालणारा रथ जमिनीवर आला. आणि एकदा जमिनीवर आलेला रथ परत अधांतरी झाला नाही. एकशेवीस कोटी जनतेपैकी पंचवीस कोटी लोकांनी पंधरादिवसपर्यंत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे देवदूत म्हणून ‘हो । मी अण्णा हजारे ’ अशा टोप्या घालून आंदोलकांची भूमिका घेतली. त्या अण्णांच्यावर मुंबईतील माफियाविरोधातील आंदोलनात अशीच आक्रमक भूमिका घेणारे त्या वेळचे मुंबई महापालिकेचे उपायुक्त गो रा खैरनार यांनी असा आरोप केला आहे की, अण्णा उपोषणाच्या वेळी इलेक्ट*ाॅल घातलेले पाणी घेतात. मेधा पाटकर यांचे उपोषण सुरु असताना अण्णांनी मेधाताईंना असा सल्ला दिला की, इलेक्ट*ाॅल घातलेले पाणी घेतले तर महिनाभरही उपोषण करता येते,असा अनुभव सांगितल्याचे खैरनार यांनी वाहिन्यांच्या मुलाखतीत सांगितले. याचा अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी ‘धादांत खोटे’ असा प्रतिवाद केला पण जेव्हा खैरनार बोलतात तेंव्हा वस्तुस्थिती तपासून बघण्याची आवश्यकता असते. रामलीलावरील अण्णांचे उपोषण हे काही शेवटचे उपोषण नाही आणि लखनौयेथे जाअून तीन दिवसांचे उपोषण करण्याची अण्णांची घोषणा आहेच त्यामुळे त्याची प्रचीती आल्याखेरीज राहणार नाही. हिदस्वराज्य ट*स्ट हाही असाच प्रकार आहे. अण्णांच्या साठीच्या कार्यक्रमात अण्णांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जादा खर्च केला. तो विषय मोठा नाही पण त्यातील काही अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिल्याने ती बाबही कसोटीला लागणार आहे. या कसोटीत अण्णा टिकतील याबाबत जाणकारांच्या मनात शंका नाही.
अण्णांच्या आंदोलनात अचानक सिव्हिल राईटस्वाल्यांनी डोके वर काढल्याने अनेकांना धक्का बसला. अचानक प्रशांत भूषण यांनी काश्मीरसार्वमताला पाठिबा देण्याचा विषय कोठून काढला यांचे गूढ उलगडले नाही. ही चळवळ गेली अनेक वर्षे भारतात अमेरिकेतील काही संस्थांच्या मदतीने काम करत असते. भारतातील भ्रष्टाचार निर्मुलन,ग्रामीण भागातील आरोग्य, आदिवासींचा विकास अशा विषयासाठी मोठी मदत देण्यात येते व त्यांना लोकजीवनात मानाचे स्थान मिळाले की, मग काश्मीरचे सार्वमत आणि ईशान्य भारतातील छोटी छोटी स्वतंत्र राज्ये यांच्या स्वमताचा अधिकार हे विषय काढतात. समाजवादी गटाप्रमाणे यापैकी कोणालाही कधीही जनमताचा आधार नव्हता. सध्या तर महाराष्ट* एटीएसने या सर्व संघटनांची चौकशी नक्सलवाद्यांना मदत करणार्या संघटनांच्या यादीत सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात अंधश्रद्धासंघटनेचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या संघटनेचीही चौकशी या नक्सलवाद्यांच्या संदर्भात सुरु झाली आहे. महाराष्ट*ात लवासाविरोधी आंदोलनाचा फायदा घेअून पश्चम महाराष्ट*ातील पुणे,नाशिक औरंगाबाद या भागात नक्सलवादी संघटना सक्रीय झाले असल्याचे महाराष्ट* एटीएसने जाहीर तर केले आहेच पण दोन मोठी अटकसत्रेही केली आहेत. या चळवळीचा इतिहास जुना आहे. महाराष्ट*ात पाचगणीयेथे मॉरल रि आर्मामेंटमध्ये या संघटनांच्या परिषदा होत. अलिकडे ईशान्य भारतातील मिझोराम, नागालॅण्ड आणि मेघालय या राज्यातील चर्चसंघटनेची त्यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेधा पाटकर आणि पाणीचळवळीत काम करणारे राजेंद्रसिह यांनी त्यांचे या सर्वांशी असलेले सबंध कधीही दडवून ठेवलेले नाहीत.
पस्तीस वर्षापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही ही मंडळी संघटितपणे सक्रीय झाली होती.आज ईशान्येकडील राज्यात भूमिगत संघटना होत्या त्या प्रथम आणिबाणीविरोधी आंदोलनात उतरल्या होत्या. त्यावेळी तो प्रकार अशा टोकाला गेला की, ख्रिश्चन मिशनरीज हे देशात निरनिराळी आकर्षणे दाखवून धर्मांतरे करतात व त्यातून राष्ट*ांतर होते हा विषय त्यावेळचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनीही मान्य केला. त्यातूनच ओम प्रकाश त्यागी यांनी भारतीय संसदेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक ’मांडले. ते विधेयक या मंडळींना येवढे झोंबले की, त्यांनी जनतापार्टीचे सरकार पाडणे स्वीकारले पण धर्मस्वातंत्र्य विधेयक स्वीकृत करण्याची मोरारजींची भूमिका स्वीकारली नाही. आज अण्णा टीममध्ये मेधा पाटकर, राजेंद्रसिह, प्रशांत भूषण जे भूमिका स्वीकारत आहेत ती यापूर्वी मधू लिमये यांनी स्वीकारली होती यावर याच महिन्यातील लेखात मी उल्लेख केला होता. त्यावेळी या मंडळींचे मधु लिमयेपण येवढ्या लवकर स्पष्ट होईल, असे मात्र वाटले नव्हते.
या संदर्भात अण्णा टीम फुटली असे वाटायचे काही कारण नाही कारण लोकांना जशी वाटते तशी अण्णांची टीम कधी नसतेच आणि आंदोलनापुरते बोलायचे झाल्यास अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांची भेट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
– मोरेश्वर जोशी, पुणे