
मुंबई, दि.०१ ऑक्टोबर- महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश यांस त्यांची स्वाभिमान ही संघटना स्वतंत्रपणे चालविण्यास काँग्रेसची कोणतीही हरकत नाही, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे. पक्षातील नेत्यांच्या मुलांनी चालविलेल्या इतर संघटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे भीमदेवी थाटाचे वत्त*व्य करणार्या माणिकरावांनीच ही कोलांटउडी मारल्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
