
पुण्यातल्या ३२ गणश मंडळांवर पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल या नोटिसा आहेत.या प्रकाराने मंडळचे प्रतिनिधी चिडले आहेत आणि त्यांनी या नोटिसांना सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. ही ३२ मंडळे एकत्रित येऊन हे आव्हान देतील आणि पोलिसांनी दिलेल्या या नोटिसा मागे घ्याव्यात अशी मागणी तर करतीलच पण या नोटिसा देणार्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या कराव्यात अशीही मागणी करतील. असे पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी म्हटले आहे. त्यांनी या नोटिसांचे वर्णन खाकी दादागिरी अशा शब्दात केले आहे. या दादागिरीला सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिले जाईल असे गोडसे म्हणत असले तरी ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. न्यायालयात या ३२ मंडळांची बाजू मांडण्याची कामगिरी नामवंत वकिलांवर सोपविली जाईल आणि त्याचा खर्च आपले मंडळ करील असे गोडसे यांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात ते वकिलांकडे जातील किवा सर्वोच्य न्यायालयातही जातील तेव्हा त्यना, अशा नोटिसांच्या निमित्ताने थेट सर्वोच्य न्यायालयात जाता येत नसते याची कल्पना येईल. या संबंधात दोन पातळ्यांवर चर्चा करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांनी दिलेल्या नोटिसा या प्रचलित कायद्याला धरून आहेत की नाही ? हे प्रथम पहावे लागते. या नोटिसा तशा कायद्याला धरून असतील तर पुढची चर्चा होईल.
