राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार :आगामी निवडणुकांसाठी केवळ स्वच्छ चारित्र्याचेच उमेदवार

मुंबई दि.०६ सप्टेंबर- ज्येष्ठ समाजासेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने राष्ट्रवादी काँग्रेसला पछाडले आह. पुढील वर्षाच्या सुरूवातील होणा-या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार शोधण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे.
राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय महाराष्ट्रप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे देशातल्या जनतेला भ्रष्टाचाराचा तिटकारा आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांना उमेदवारांची निवड कठोर निकष लावूनच करावी लागणार आहे. राज्यात अलिकडेच उघडकीस येत असलेल्या विविध घोटाळयांमुळे आगामी निवडणुकांसाठी स्वच्छ चारित्र्याचेच उमेदवार निवडण्याची सक्त ताकीद राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व संबंधितांना दिल्याचे नाव उघड न करण्याच्या बोलीवर एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.  तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस समवेत आघाडी करण्याबाबतचा निर्णय परिस्थितीनुरूप स्थानिक नेत्यांनीच घ्यावा असेही  पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आल्याचे या नेत्याने सांगितले.

Leave a Comment